चारोळी-१

वाटते मनास माझ्या
मज तू इतके जवळ करावे
व्हावे काजळ मी
अन तू नयनि मला भरावे

तुझ्या नयनांचा तीर पहीला
काळजाच्या असा पार झाला
समजण्यापुर्वीच काही मी
मनावर प्रेमाचा हलका वार झाला

माझ्या दु:खांचा जेव्हा
मी बाजार मांडला होता
माझी दु:ख बघायला
सारा गाव भांडला होता

प्रेम करणं याला इथं
गुन्हा म्हणतात
मरायच्या आधिच
प्रेम करणारे हजारदा मरतात...

कोण आहेस तू....
सांगु कसे हे मी तुला
तो आरसाच फ़ितूर
दाखवी फ़क्त तुझा चेहराच तुला

फ़ना होते हुए तुझपर मर भी जाऊ अगर
मेरी मौत का तू गम ना करना
कुछ तो रिश्ता रख हमसे ए जालीम
मोहब्ब्त ना सही....पर नफ़रत हमसे तू कम ना करना

कफ़न ओढा देना लाशपर हमारे
जब ये उनकी गलीसे होकर निकलेगी
हमने तो कर दी है बंद
पर उनको देखने शायद ये आखें फ़िरसे खुलेगी

काजळी ही रात्र धुंद
तुझ्या मिठीचा ओलेला बंध
थांबावा क्षण इथचं हा...
तू अन मी ..साथीला हा श्रावण बेधुंद

काळोखच मला बरा वाटतो
तोच सार्‍या जगापासुन असतो मला वाचवत
माझाच चेहरा बर झालं
तो मला नाही दाखवत

तुझे डोळे बोलके बरचं काही बोलून जायचे
भेद तुझ्या मनीचे सारेच खोलून जायचे
शब्दांची गरज होतीच कुणाला
अबोल ओठच तुझे जणुन शब्दांची मैफ़ल व्हायचे

पायात रुते जर काटा
सल त्याची काळजास होई....
तरीही या बिचार्‍या काळजास
स्वत:हास काटा रुतवुन घेण्याची घाई.....

पून्हा पाउस आज कोसळुन गेला
मनात निजलेला आठवणींच्या समुद्रास तो फ़ेसाळुन गेला
तुझ्याशिवाय सावरलेल्या मला
एका क्षणात कसा ढासळून गेला

मी आहे थोडासा वेडा
मला थोडसं समजुन घे
रागावलो तरी...खोटचं तेही
रागास माझ्या तू उमजुन घे

माझं एकलंपण पाहुन
पावसाचा एक थेंब माझ्या तळहातावर उतरला
म्हटलं...एवढ्या दूरवरुन आला
अन माझ्या एकट्यासाठी बिथरला

पावसाचा थेंब कुठंही बरसला तरी
त्याला समुद्रालाच मिळायचं असतं
क्षणभराची ढगाची मैत्री तोडुन
समुद्राचचं नातं त्याला पाळायचं असतं

श्रावण आला निळ्याशार त्या अंबरातुनी
मेघ गेला एक सबंध रानभर बरसुनी
पुन्हा जागली नवलाई अन हिरवाई
सुरु जाहला खेळ..... क्षणात पाऊस क्षणात उन्हाची घाई...

मन भरुन आलं जुन्या आठवणींनी
आणी ते क्षण आठवले
म्हणत होतो मी मलाच रुक्ष
पण त्या क्षणांनी डोळ्यांत दोन आसवं दाटवले

आसवं माझी मी लपवून पाहीली
दु:खं माझी मी खपवून पाहीली
पावसात भिजण्यास गेलो
पापणी माझी बेफ़ाम होवुन वाहीली

खुप काही सोसावं लागतं
थोडंसं हसू मिळवण्यासाठी
हातभर दु:खांशी तडजोड
वितभर सुख उरी बाळगण्यासाठी

खुप काही सोसावं लागतं
तू दुर निघुन जाताना
कशा सांगु या मनाच्या वेदना
श्वास माझे मला सोडुन जाताना

खुप काही सोसावं लागतं
जेव्हा तुला आठवणं होतं
मग भुतकाळाच मनात दाटणं
अन आसवांचं पापण्यांआड साठवण होतं

माझ्या जगण्याला
माझ्या शब्दांचा आधार
सारं जग माझं
मी शब्दांवीना निराधार

मला दिलेली सगळी वचनं
जेव्हा तू सहज मोडली
अगदी तेव्हाच माझ्या श्वासांनी
माझि साथ सोडली

तू आणी तुझे शब्द सारखेच
कधिच वेळेवर येत नाहीत
मी मात्र वेडा
वेळ येण्याची कधि वाट बघत नाही

कधि मी आणी माझे शब्द
तुझ्यासाठी गीत गायचे
आज फ़क्त डायरी उघडुन
ते जुने शब्द वाचायचे

एक ना एक दिवस
माझ्या अश्रुंची किंमत तुला नक्की कळेल
पण कधी?
हं...कदाचीत मी जेव्हा सरणावर जळेल

मी आहेच जरा असा
शब्दांनी बेभान होणारा
श्वासांना माझ्याच परके
अन शब्दांना आपले म्हणनारा

पुन्हा माझे शब्द
आणी तुझ्या आठवणींची भेट झाली
पुन्हा डोळ्यांत या
आसवांची हलकी लाट आली

जगण्याची मुहुर्तमेढ
पुन्हा रोवुन बैसलो मी
अता घाबरु कुणाला
त्या मरणाकडे स्व:त धावुन बैसलो मी

प्रेम इथं नाकारलं जातं
तरीही कृष्णास इथं भजलं जातं
प्रेम असतं कुणाचं
पण भाळी दुसरचं कुणीतरी सजलं जात

पुन्हा एकदा
शब्दांची मैफ़ल सजवली मी
पुन्हा एकदा तुझी प्रित
माझ्या शब्दांत भिजवली मी

मी कुठे अजुन पत्ते उघडले
त्यांनीच डाव मोडला
मी जिंकणार इतक्यात
त्यांनी डाव सोडला

आता मलाही जमायला लागलं आहे
तुझ्याशिवाय जगणं
रात्रींचे दिवस करुन
स्वप्नांत तुला बघणं

ती वाट आणी ते वळण
कधिच नजरेआड झालयं
तुझ्यावीना जगलो आजवर
आता शेवटचं वळण आलयं

मी अखेरच्या वळणावर
आणी तुझ्या माझ्या हातात हात
तुला आपलं म्हणु तरि कसा
मरण माझं नेहमिच माझ्या साथ

जरा सांभाळुन ये
मला भेटायला येताना
जग टपलेलंच असतं
तू घरातुन बाहे्र निघताना

मी मरताना माझां गाव
माझ्यासमोर असेल सारा
मी एकटाच निपचीत पडलेला
एरवीचं वादळ...आज निर्मोही वारा

त्या वादळास मी सांगतो की
'तुलाच मी लुटणार आहे'
आज दिवस तुझा
उद्या मी सुटणार आहे!

जगायचं किती आणी कुठवर
रोज रोज तोच दिवस
रात्र सरते..पहाट होते....
पुन्हा एकदा जगण्याचे नवस

जरा सांज ढळू दे
सये चंद्रास थोडं जळू दे
मग दीप मालव
आणी ओठांना ओठांनी छळू दे

थोड्या विसाव्यानंतर
मी पुन्हा येणार आहे
मी एक झंझावात
मी कधि थांबणार आहे?

माझ्या अंगणाचा पारिजात
तुझ्यासाठीच खुलतो आहे
कधितरी तू येशील म्हणुन
वादळं आणी पाऊस झेलतो आहे

माझ्या वेदनांचा
मी कधिच बाजार मांडला नाही
तसं...माझ्या वेदना पहायला
कुणीच कधि भांडला नाही

आठवणी आठवुन जगावं
दु:खांचा बाजार जरा ओसरतो
नाहीच मिळालं काही तरी
आठवणींचा सुगंध आयुष्यभर पसरतो

तुझी आठवण आल्यावर
माझं माझ्याशिच खुदकन हसणं होतं
वेळ तेवढ्यापुरती निघुन जाते
अन पुन्हा माझ्याशी माझं रुसणं होतं

माझ्या आयुष्याचे कितीतरी क्षण
तू सोबत घेउन गेलिस
अन बदल्यात मला
तुझ्या छळवादी आठवणी देवून गेलीस

मी असे काय लीहीले
ज्यास ते जाळून गेले
त्यांची सारी पारायणं माझ्यासमोर
आज पुन्हा ते उगाळून गेले

तुझ्या विरहात तुझ्या आठवांचे
असे निखारे पेटले
तुला सुखाच्या झोपाळ्यावर झुलताना पाहुन
निखारेही मज चांदण्यासम वाटले

निखार्‍यांवरुन चालण्यास माझि
कधिच ना नव्हती
पण तुझी मात्र एकदाही
फ़ुलांवरुन चालण्यास हा नव्हती

अश्रुंना माझ्याच रागावलो मी
कधिही तुझ्या विरहात बरसत असतात
मी श्रावणात भिजताना
तेही बरसण्यासाठि तरसत असतात

सये तू जवळ नसताना
श्वास माझेच माझ्याशी परके होऊन वागतात
कदाचित माझ्यासवे तेही
तुझ्या आठवणींत मला विसरतात

सये तू नसताना
तुझ्या आठवणींत वेडापिसा होतो
मी घेतलेला प्रत्येक श्वास
सये, तुझ्याविणा नकोसा होतो

सये तू जवळ नसताना
तुझ्या असण्याचे भास
सये तू जवळ नसताना
माझे रीते रीते श्वास

सये तू जवळ नसताना
तुझ्या येण्याची चाहूल
तू येत नाहीस कधि
मनावर उमटतं तुझ्या आठवणीच पाऊल



सये तू जवळ नसताना
सारं जग वीरान वाटू लागतं
इवल्याशा मनात माझ्या
तुझ्या आठवणींचं प्रचंड आभाळ दाटू लागत

सये तू जवळ नसताना
मी कुठेचं नसतो
तू असताना मात्र
सारं जग विसरून तुझ्या डोळ्यातुन हसतो

सये तू जवळ नसताना
पाऊसही मला टाळून जातो
तो बरसतो रानभर
मला मात्र जाळून जातो

सये तू जवळ नसताना
मी जगावं कसं सांग ?
तुझ्यावीना माझ्या डोळ्यांनी
काही बघावं कसं सांग?


मी तुझ्याकडे पाहिल्यावर
ढळणारी सांज थांबली
तुझ्या ओठांची लाली मिळावी जरासी म्हणुन
तीही मुद्दामहुन लांबली

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
पुन्हा जगावसं वाटलं
तुझ्याशिवाय जगलेलं आयुष्य
पुन्हा मागावसं वाटलं

सये तू जवळ नसताना
चंद्रही नेहमीसारखा खुलत नाही
तुझा गंध घेतल्याशिवाय आता
सये रातराणीही खुलत नाही

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
तुझ्या नजरेत नजर मिसळली
एरवी मंद होती
आता मात्र स्पंदनांची लाट उसळली

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
प्रेम काय असतं हे समजलं
क्षणभर वाटलं,
जगात सर्वात सुंदर प्रेम - जगाला अजुन नाही उमजलं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
नवी स्वप्न सजु लागतात
आयुष्यातली सारी दु:ख
सुखं होण्यासाठी धजु लागतात

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
वाटले, जणु हा जन्म कमी पडेल
तुझ्याशी प्रेमाचं हे नातं
आता जन्मोजन्मी जडेल

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
चंद्र बिचारा माझ्यावर जळत असतो
हुशार आहे पण तोही
ढगाआड जातो तो, मी जेव्हा तुझ्या मीठीत ढळत असतो

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
वाटतं, आता सारं थांबाव
फ़क्त याच एका क्षणानं
आता आयुष्यभर लांबावं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
तू तरी कुठे स्वत:ची उरतेस
मी तुला पहावं पुन्हा पुन्हा म्हणुन
रोज माझ्यासाठी सजतेस

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
सारं जग फ़ितुर होतं
का ग राणी हे असं
सौंदर्याच्या नाशासाठी जग सारं आतुर होतं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
वाटतं, सारं आयुष्य तुला द्यावं
बदल्यात फ़क्त एकदा
मला तू तुझ्या मिठीत घ्यावं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
मन क्षणभर बावरलं
नंतर पटलं
बावरल्या मनाला तुच तर सावरलं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
माझाही मी उरत नाही
तुझ्याकडं पाहताना
या जगात मी मलाही धरत नाही

चारोळी-२

तु निमित्त आहेस म्हणुन
हा बाजार दु:खांचा आवरला मी
कडेलोट होणारा हा देह
तुझ्याचसाठी सावरला मी

तु निमित्त आहेस म्हणुन
मनात साठलेल्या आसवांचतरी डोळ्यांवाटे गळणं होतं
अरे दु:खां फ़क्त तुच माझा
पापण्यांत ओलावा आहे थोडासा हे तुझ्याचमुळे कळणं होतं

तु निमित्त आहेस म्हणुन
मी काट्यांनाही फ़ुलांचा गंध वाटतो
तुझ्यावीना मात्र
ऐन श्रावणातही माझ्यासाठी ग्रिष्म दाटतो

तु निमित्त आहेस म्हणुन
आयुष्याचा प्रत्येक क्षण सोनेरी आहे
तुझ्याशिवाय जगणं
हा विचारसुध्दा किती जिव्हारी आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
फ़क्त म्हणुनच मनाला थोडासा आधार आहे
तुझ्या मैत्रिशिवाय तसा
सगळ्यांचा असुनही मी निराधार आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
मरणाचही आता भय वाटत नाही
मरण माझं दारात उभं
अन मला तुझी सय सुटत नाही

तु निमित्त आहेस म्हणुन
मी या नियतीशी लढणार आहे
ठाउक आहे जरी मला माझ्या राखेवरुन
तु आयुष्याचा हा चढ चढणार आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
मलाच विझवुन घेतले मी
समोर चिता होती जरी
हसत जाऊन मला सजवुन घेतले

तु निमित्त आहेस म्हणुन
तोच डाव पुन्हा खेळणार मी
तू गेलीस जरी एक क्षणही
तुझ्या स्वप्नांतुन ना ढळणार मी

मुळासकट उखडुनसुध्दा एक झाड
तग धरुन होतं
स्व:त संपत असतानाही
कुणासाठी ते सावली करुन होतं

जेव्हा जेव्हा आवडली
मला एखादी कळी
तेव्हा तेव्हा नशीब म्हणालं
मला हवाय तुझा बळी

जगापासुन दूर झालं म्हणुन
एक पाखरू ऊंच आकाशात तडफ़डत होतं
जग त्याच्यापासुन दूर
म्हणे ते आनंदाने फ़डफ़डत होतं

प्रेम आहे
म्हणुनच इथं जगणं होतं
रात्रिंना जागुन
दिवसा स्वप्नांना बघणं होतं

प्रेम!
नुसती कल्पनाही सुखावुन जाते
आयुष्याच्या वळणावर प्रत्येक दु:खाला
आपल्यात सामावुन घेते

प्रेम!
प्रत्येकानं एकदातरी करुन पहावं
स्व:त जगतानाही
दुसर्‍यासाठी कधि मरुन पहावं

प्रेमाची भाषा जरा अवघड असते
सगळ्यांनाच समजत नाही
ज्यांना समजते
त्यांना जगाचे बोल उमजत नाही

प्रेमात असलनां
मग सारी दु:ख सुखं वाटु लागतात
एकटं असल्यावर मात्र
सारी सुखही कटु लागतात

प्रेमात देवाणघेवाण होत नाही
तिथं फ़क्त देणं असतं
स्व:तला विसरुन
दुसर्‍यासाठी जिणं असतं

प्रेम म्हणजे शांत वादळ असतं
ज्याला सगळेचजण झेलुन घेतात
प्रेम म्हणजे मरण असतं
ज्याच्यासोबत सगळेचजण खेळुन घेतात

प्रेमाची साथ असली ना
की काट्यांतुनहि चालणं होतं
प्रेमाला पाहुन मग
त्या काट्यांचही फ़ुलासारखं खुलणं होतं.......

चारोळी-३

माझ्या प्रत्येक शब्दात तू...
फ़क्त तुच उरली आहे..
तुझ्या शब्दांसाठी जगतोय
जिंदगी तशी कधिच सरली आहे....

या रस्त्यावर मी चालतो
एकटाच दुरवर.....
साथीला फ़क्त भास
आठवणी मनात खोलवर

तुझी आठवण झाली की
मी मलाच हरवुन बसतो
मग मोबाईल उघडुन
तुझे जुनेच एसएमएस वाचत असतो

तुझ्या आठवणी आल्यावर
जुन्या क्षणांचा मेळ सुरु होतो
आठवणी येत राहतात
अन शब्दांचा खेळ सुरु होतो

पुन्हा मला हसायचं आहे
पुन्हा मला जगायचं आहे
कुणालातरी वाहण्यासाठी
अजुन आयुष्य मागायचं आहे

बरं झालं शब्दांची तरी साथ आहे
थोडंस दु:ख वाटुन घ्यायला
नाहीतर सारखाच लागला असता
मला जाम भरुन घ्यायला

लाट आली की
लाटेबरोबर किनारा दुर वाहुन जातो
लाट फ़िरते माघारी
किनारा मात्र तिथंच राहून जातो

स्वप्नं आभासी असली
तरी बरी वाटतात
दिवस प्रत्येक खोटाच इथं
क्षणभर स्वप्नचं खरी वाटतात

आयुष्य जगायची ती वाट आता नको
आयुष्य जगताना कोणतीच अट आता नको
सराव झाला मला काळरातींचा
प्रेमाची कोणतीच पहाट आता नको.........

तुझ्यानंतर तुला आठवणं
आता नित्याचं झालय....
तुझ्या आठवणींत रात्रींना जळतो
ते पण आता सरावानं आलयं.........

कविचं आयुष्य खुप सोपं असतं
दु:ख शब्दांच्याआड लवपता येतात
निखळलेच दोन अश्रु चुकुन तरी
शब्दांची झालर चढवुन तेही खपवता येतात

माझि मैत्रिण म्हणुन तुझं असणं
म्हणजे वाळवंटातही एखाद्या फ़ुलाचं खुलणं
तुझि मैत्रि आहे सई म्हणुनच होतं
क्षणभर आयुष्याच्या हिंदोळ्यावर ह्सत खेळत झुलणं

तुझी मैत्रि आहे म्हणुन
या मृगजळासही अस्तित्वाचा भास
एरवी मात्र.......
एका अनोळखी वाटेनेनुसता अखंड प्रवास

(Reply for above lines by one of my best friend)
तू मृगजळ म्हणतोस स्वतला
जे मिळवता येत नाही कुणाला
पण तुझी मैत्री लाभावी म्हणून
वाळवंटात राहणही चालेल मला.....................

तु निमित्त आहेस म्हणुन
या वाळवंटातही जगणं होतं
एरवी मात्र
ऐन श्रावणातही या मनाच जळणं होतं

तु निमित्त आहेस म्हणुनच फ़क्त
मी माझा आहे
तुझ्याविना मात्र
जिवन जगणं फ़क्त एक सजा आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
आयुष्य नवी उभारी घेऊ पाहतं
तू साथ असल्यावर
मरणही क्षणभर दूर उभं राहतं

तु निमित्त आहेस म्हणुन
जगण्याची आस आहे
तु नसलीस तरी या मनात
तुझी आठवण खास आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
कणाकणाचं मरणंही मला पसंत आहे
तुझ्या आठवणी आहेत म्हणुनच
या ग्रिष्मातही जणू वसंत आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
जिंकलो असा जरी हारलो मी
तू गेलीस अन
जिंकुनही असा सरलो मी

चारोळी-४

सागराला ओढ किना-याची
तर किना-याला भिती वाहुन जाण्याची
कशी ही एकेरी नाती
या वेड्या मनांची

रुपेरी किनार असली तरी
ढग पांढरा शुभ्र नसतो
बाहेरुन सोनेरी दिसणारा ढगही
आतुन काळोखाने भरलेला असतो

जीवनाचा प्रत्येक क्षण
आपल्याला काहीतरी देत असतो
पण नकळतपणे
आपल्या आयुष्याचा
एक क्षण तो घेत असतो

जुळले काही शब्द
पुन्हा चार ओळी झाल्या
नसलीस तु जरी
आठवणी तुझ्या तुलाच घेउन आल्या

आता मीही
तुला सांगायचं टाळतो
प्रेमाची तुझी रीत
आता मीही तुझ्यासारखीच पाळतो

एकदा तुला म्हटलं होतं
आयुष्यभर तुझी साथ देइल
मला कुठं ठाउक होतं तेव्हां
आयुष्यचं माझी साथ सोडुन जाइल

जेव्हा सा-या जगाचं
माझ्याशी रुसणं होतं
तेव्हां क्षणभर परकं होऊन
स्वत:चचं स्वत:शी हसणं होतं

प्रत्येकाच्या मनात
आठवणींचा एक कपा असतो
जुन्या क्षणांना विसावण्यासाठी
मनानं बांधलेला खोपा असतो

पाऊस आला की
पावसाच्या आठवणींत बुडतो
अन पाऊस गेला की
आठवणींचाच पाऊस पडतो

पावसात चालायला मला खुप आवडतं
पावसात भिजायला मला खुप आवडतं
लोक मला वेडे म्हणतात
पण याच पावसात मला माझं बालपण सापडतं

मित्रांचं
सोबत असणंही खुप होतं
सोडुन जाताना
मनातल्या मनात रडु येतं

मैत्रि...
शब्द तसा लहान आहे
पण आत दडलेला अर्थ..
शोधता आला तर खुप महान आहे

जरा जपुन
आता चंद्राचीही तुला नजर लागेल
मला भेटायला आल्यावर
तोही तुझ्याशी परक्यासारखा वागेल

वाटतं...
तुझ्याकडं असचं पाहत राहावं
आपलं आयुष्य एकदाच तुला देऊन
कायमचं तुझं होऊन जावं

एरवी छळणा-या वा-यास विचारलं मी
का रे बाबा...आजकाल नुसताच वाहुन जातोय?
वारा म्हणाला...
वेड्या मी तुझ्या घराचं माप घेतोय

पहिला पाऊस आला
तुझी आठवण करून गेला
तुझ्यावीणा सखे...
माझ्याबरोबर तोही रडुन गेला

पहिला पाऊस म्हणजे
जणु पहीलं प्रेम असतं
कीतीही भिजलं त्यात तरी
मन भरत नसतं

तु नसलीस तरी
क्षणोक्षणी तुझा भास आहे
तुझ्या आठवणी आहेत म्हणुन
आजवर माझा श्वास आहे

कोणत्या प्रश्नांची
तुला कीती उत्तरं देऊ?
जग सारचं फ़ितुर इथं
मी नाव कुणाचं घेऊ?

पावसाचा एक थेंब म्हटला
मला तुझं थोडंसं आयुष्य हवं आहे
मी म्हटलं..अरे वेड्या
मीच अळवावरचं दव आहे

चारोळी-५

ऋतु क्षणात असा पालटुन गेला
ऐनवेळी आज कसा श्रावण आला?
ग्रिष्मातही मी वेडा, न्हाऊन निघालो चिंब
पाहुन डोळ्यांत तुझ्या, माझेच प्रतिबिंब

पाउस आल्यावर चंद्र
जरासा ढगाआड लपतो
तोही तुझ्याचसारखा..
स्वत:चं नाजुकपण जपतो

प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर शोधायचं नसतं
आणि उत्तर येत असुनही
कधिकधि अनुत्तरित व्हायचं असतं...

उद्याची वाट कशी पाहु?
मी तुला कसे समजावु?
उद्याचा भरवसा नाही सखे...
चल आजच जगुन घेऊ....

पुन्हा मेघ तो एक गरजुन गेला
पुन्हा श्रावण तो मज तरसुन गेला
मी राहीलो कोरडाच इथे
अन तो सा-या रानभर बरसुन गेला

मैत्री .... एक नाजूक धागा
हा दोघांनी जपायचा....
.एकानं तोडला तर
दुसर्‍यानं जोडायचा.....

दोन शब्द बोल मित्रा
इतर काही मागत नाही...
तुझी मैत्री असल्यावर
आयुष्य जगायला दुसरं काही लागत नाही...

आकाशातील तारासुध्दा
माझ्याशी आता परक्यासारखा वागतो...
मागणं माझं काहीच नसतं
तो मात्र रोजच तुटतो..

श्रावण....
येताना खुप पाउस घेऊन येतो
अन जाताना
पावसाइतक्या आठवणी देऊन जातो...

पावले चालत राहीली दुरवर
पाउलवाट मागेच अडखळुन पडली...
साथीला होते कोण कधि?
नाती सारी कधिच गळुन पडली...

सारेच जण इथं
एक कायदा चोखपणे बजावतात
जिवंत माणसाला जाळुन
मेल्यावर त्याचं प्रेत सजवतात

तु गप्प रहा अशीच
तुझ्या डोळ्यांनाच बोलु दे...
तुझ्या डोळ्यांची मुक भाषा
माझ्या डोळ्यांना कळु दे...

आता तो रस्ताही मूक झालाय
ज्यानं आपण चालायचो...
आज तु गप्प ...मीही गप्प...
कधि आपण त्या पानाफ़ुलांशी बोलायचो

माझ्या मनाशी होणारा संवाद ही
आता मी टाळतो
आजकाल माझ्याशीच
मी मुक होऊन वागतो

सांज ढळते
तुझ्या भेटेची आस अधिक छळते
ये निघुन प्रिये तु....
ठाऊक मज तुही माझ्याच आठवणींत जळते

पावसात भिजुन घेतो
मी पावसाशी हसुन घेतो
पावसातच अश्रु लपतात माझे
म्हणुन पावसाशीच मी रडून घेतो....

तु फ़क्त सोबत रहा मित्रा
हे आयुष्य असचं जगुन घेईल..
.मागितलंस कधि तर
सारं जगही जिंकुन तुला देईल...

सुर्य ढळला....आता चंद्र येईल
अन सबंध आसमंत त्याच्या मंद प्रकाशात न्हाऊन जाईल...
माझ्याही शब्दांना मग उधान येईल
आठवुन तुला...पुन्हा अशीच एखादी कविता जन्म घेईल...

कधि कधि माझचं लिहीणं
मला पटत नाही
शब्दांत मांडलेलं मनाचं कोडं
मग मलाच सुटत नाही

आयुष्यभर रडू नकोस
माझ्यापासुन दूर झाल्यावर
पण एक अश्रुतरी ढाळ
मला सोडुन चालल्यावर

चारोळी-६

तु समोर असलीस की
सारं जग परक होतं
एरवी आभळ पेलणारं मन
तेवढ्यापुरतं हलकं होतं

तु समोर असलीस की
पहिल्यापासुन जगावसं वाटतं
सारं जग तुझ्या नजरेनं
नव्यान बघावसं वाटतं

तु समोर असलीस की
मी मलाही परका होतो
तु फ़ुल अन मी
फ़ुलपाखरासारखा होतो

तु समोर असलीस की
वेळेचं भान उरत नाही
तुझ्यासोबतचा एक क्षण
युगं न युगं सरत नाही

तु समोर असलीस की
नुसतचं तुला पाहणं होतंअ
न तु गेल्यावर
शब्दांतुन तुला लिहीणं होतं

एक फ़ुलपाखरु
हलकेच हातावर येऊन बसलं
मला पाहुन तेही
तुझ्यासारखं खुदकन गालात हसलं

ए पावसा...
तु जा अन माझ्या प्रियेला भिजवुन ये
माझ्या वतीनं माझं प्रेम
तीच्या मनात रुजवुन ये

तु समोर असलीस की
डोळ्यांत तुझं साठणं होतं
मग तु नसताना
डोळे बंद करुन स्वप्नांत तुला भेटणं होतं

तुला बघुन
फ़ुल उमलुन येत
तेही जणु तुझचं
नाजुकपण घेत

मरण्याआधी माझी चिता
मलाच सजवायची आहे
आयुष्यातली शेवटची कामगिरीसुध्दा
मलाच बजवायची आहे

तु समोर असलीस माझ्या
की श्रावणही तरसु लागतो
विसरुन नियम त्याचे
तो ग्रिष्मातही बरसु लागतो

तु समोर असलीस की वाटतं
माझं सगळं तुला द्यावं
बदल्यात तुझ एक
फ़क्त एक हसु घ्यावं..

आठवतं तुला...
आपण दोघं पावसात भिजायचो
गारठुन गेल्यावर मात्र
एकमेकांच्या मिठित थिजायचो...

असंच एखाद्या दुपारी
आठवणींच आभाळ मनात दाटु लागतं
ग्रिष्मातलं उनही मग
श्रावणातलं वाटु लागतं

पुन्हा सांज आली
याद तुझी पुन्हा झाली
तुजवीन प्रिये...
जिंदगी माझी मलाच पोरकी झाली

तुझ्या गावची
रितच आगळी आहे
येथे कुणी न माझे
तुही वेगळी आहे

तुझी वाटेतली भेटही
आता मी मुद्दाम टाळतो
तु गेल्यावर माझं काय?
या विचारानं आजकाल मी मलाच जाळतो

पुन्हा आली ही कातरवेळ
मनात एक हूरहूर दाटवण्यासाठी
जुन्या आठवणींतली अशीच एक
आठवण आठवण्यासाठी

खुप खुप कोसळतो जरी
पाऊस आपल्या दोघांनाही हवा आहे
तुझं प्रेम मला नी माझं प्रेम तुला देतो
आपल्या प्रेमाचा हा दुवा आहे

ही हवा गुलाबी
जणु तुज स्पर्शुन आली
होतो मी कोरडा कधिचा
मज ती भिजवुन गेली

चारोळी-७

पावसालाही
तुझ्या पावलांची चाहुल
तुझं मला भेटायला येण्याच्या आत
त्याचं माझ्या दारात पाऊल

पावसाला सांगतो मी
माझ्या घरी तु येऊ नकोस
वाळवंटी जीवनाला
श्रावणाची जुनी आठवण तु देऊ नकोस

पाऊस आणि आठवणी
एकमेकांशी मैत्रि करतात
तसे दोघेही माझेच
पण मग मात्र माझे शत्रु बनतात

झाडाचं तुटलेलं एक पान
दुर दुर ऊडत होतं
झाडापासुन दुर झालं म्हणुन
ते खुप खुप रडत होतं...

कातरवेळ आली की
तुझ्या आठवणींचं छळण होतं
मग माझ्या मनाचं रडणं
आणी अश्रुंचं पापण्यांआड दडणं होतं

आठवणींच्या मैफ़लीत माझ्या
असचं तुझं येणं होतं
मुक शब्दांचंही माझ्या
मग सप्तसुरेल गाणं होतं

दिव्याखाली अंधार असतो
पण हे त्याला कळत नाही
स्व:त अंधारात असला तरी
स्व:तसाठी तो कधिच जळत नाही...

तुझ्याशिवाय जगणं
आता जिवावर आलयं
तुझ्या आठवणी रोज मारतात
मरण मात्र दुर झालयं

दोन पावलं चालायचं असेल फ़क्त
तर आत्ताच माझा हात सोड
आयुष्यभर नसेल टीकणार
तर मनावरुन माझं नाव कायमचं खोड

प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब
तुझी आठवण सजवुन जातो
बदल्यात मात्र स्वत:ला...
माझ्या अश्रुंत भिजवुन घेतो

खाली पडायच्या आधी क्षणभर
दव पानावर थिजुन घेत...
वेडं पान मग
पाउस समजुन दवातच भिजुन घेतं

तु गेल्यावर
मी खुप खुप रडुन घेतलं
बहरुन आलेल्या झाडानं
ऐन श्रावणात झडुन घेतलं

तु म्हणालीस म्हणुन...
आयुष्यात तुला कधिच नाही आठवणार
पण तुझ्यानंतर पोरक्या झालेल्या या मनास
कुणाकडचं नाही पाठवणारं

रात्र सरायला लागली की
पहाटेची स्वप्न फ़ुलतात
माझ्या आयुष्याच्या सा-याच वाटा
तुझ्या नयनी येऊन संपतात

तुझ्यासाठी
मी रात्रभर जागत असतो
एखादा तारा तुटताना दिसेल
म्हणुन एकटक आकाशाकडं बघत बसतो

वा-याची मंद झुळुक
पावसाची धुंद लहर
जीवनाच्या वाटेवर कधिकधि
असाच तुझ्या आठवणींनाही बहर

आयुष्य...
दिसताना एक भकास पडलेलं रान
पण पाहता आलं तर
वाळलेलं पण जाळीदार पान

समुद्राच्या दोन्ही किना-यांना
मला एकत्र आणायचंयं
त्यासाठी समुद्राच्या मध्यावर उभं राहुन
दोन्ही किना-यांकडं एकदाच बघायचयं

समजावलं खुप त्याला मी
त्याच्या मार्गातला फ़ुल बनलो अन काटाही कधि
पण त्याचं आपलं वेगळचं
जीवन म्हणे माझं सारं काही निराळचं

समुद्राला मिळाली की
नदी स्वत:चं अस्तित्व विसरते
हे तिला ठाऊक असुनही
ती जाऊन समुद्रात मिसळते

चारोळी-८

तुला आठवणं म्हणजे
तुला पाहणं आहे
क्षणभर का होईना
पण भुतकाळात जाऊन तुझ्यासोबत राहणं आहे

गुलमोहराचं वागणंही
आठवणींसारखचं असतं
सा-या जगात उन्हाळा पेटतो
अन मग हा एकटाच फ़ुलांनी दाटतो

प्रत्येक संध्याकाळी
तुझ्या आठवणींची मैफ़ल भरते...
ही मैफ़लच नंतर
एक गोड आठवण बनुन सजते

पावसाचं अन माझं
आजकाल पटत नाही
तो आला तरी त्याच्यासोबत खेळायला
मला माझं घर सुटत नाही

रोज पडणारा पाऊसदेखील
मला रोजच नविन वाटतो
प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब
मनात एक आठवण बनुन साठतो

पावसालाही
तुझ्या पावलांची चाहुल
तुझं मला भेटायला येण्याच्या आत
त्याचं माझ्या दारात पाऊल

पावसाला सांगतो मी
माझ्या घरी तु येऊ नकोस
वाळवंटी जीवनाला
श्रावणाची जुनी आठवण तु देऊ नकोस

पाऊस आणि आठवणी
एकमेकांशी मैत्रि करतात
तसे दोघेही माझेच
पण मग मात्र माझे शत्रु बनतात

झाडाचं तुटलेलं एक पान
दुर दुर ऊडत होतं
झाडापासुन दुर झालं म्हणुन
ते खुप खुप रडत होतं...

कातरवेळ आली की
तुझ्या आठवणींचं छळण होतं
मग माझ्या मनाचं रडणं
आणी अश्रुंचं पापण्यांआड दडणं होतं

आठवणींच्या मैफ़लीत माझ्या
असचं तुझं येणं होतं
मुक शब्दांचंही माझ्या
मग सप्तसुरेल गाणं होतं

दिव्याखाली अंधार असतो
पण हे त्याला कळत नाही
स्व:त अंधारात असला तरी
स्व:तसाठी तो कधिच जळत नाही...

तुझ्याशिवाय जगणं
आता जिवावर आलयं
तुझ्या आठवणी रोज मारतात
मरण मात्र दुर झालयं

दोन पावलं चालायचं असेल फ़क्त
तर आत्ताच माझा हात सोड
आयुष्यभर नसेल टीकणार
तर मनावरुन माझं नाव कायमचं खोड

प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब
तुझी आठवण सजवुन जातो
बदल्यात मात्र स्वत:ला ...
माझ्या अश्रुंत भिजवुन घेतो

पावलोपावली
तुझी साथ आहे
दूर असलीस तरी
क्षणोक्षणी तुझाच भास आहे

तुझ्याकडं पाहताना
मनातलं बोलायचं राहुन गेलं
श्रावणाची वाट पाहताना
आभाळ कधिच वाहुन गेलं

तुझं सगळं तु मला दिलं
तुझं असं काही उरलं नाही
नशीब माझंचं फ़ाटकं
तुझं सगळंही मला पुरलं नाही

तुझ्याच केसांचि एक बटही
आपल्या प्रेमास नडली
तुझ्याकडं पाहताच येऊन
तुझ्या गालावर पडली

तुझ्या घरासमोरील गुलमोहरही
माझ्यासारखाच वेडा आहे
पावसाळा कधिच सरून गेला
तरी अजुन त्याला आकाशाचा ओढा आहे

चारोळी-९

शब्द माझे असतात उनाड वा-यासारखे
अन कधि रिमझिमत्या श्रावणसरिसारखे
दोन क्षण घेतो विसावा कुणी कधि येथे...
मग होतात शब्द माझे खळखळणा-या झ-यासारखे...

शब्दांना जुळायला वेळ लागत नाही
शब्दांना कळायला वेळ लागतो
शब्दांशी खेळताना
मनाशी भावनांचा खराखुरा मेळ लागतो

शब्दांशी शब्द जुळतीलच असं नाही
शब्दांनी शब्द पेटतीलच असंही नाही
तरीही शब्दांना बांधावच लागतं
भावनांचा खेळ खेळताना शब्दांच्या कुशीत शिरावचं लागतं

शब्दांशी मैत्रि असावी
म्हणजे हवं तसं जगता येतं
जग रडत असलं बाहेर
तरी एकट्याला हसता येतं...

तुझी मैत्रि आहे म्हणुन
या मृगजळासही अस्तित्वाचा भास
एरवी मात्र.......एका अनोळखी वाटेने
नुसता अखंड प्रवास

असं वाटतं आता शब्दांचीही साथ सुटेल
आणी मी पुरता एकटा होईल....
'आता कुणासाठी जगतोयसं?' असं म्हणत...
आयुष्य क्षणोक्षणी चटका देईल...

आयुष्यभर चातक बनुन
मी पावसाची वाट पाहीली
पण...या वाळवंटात मात्र
फ़क्त माझीच पापणी वाहीली...

अशा धुंद श्रावणात बेधुंद रात येते
छेडीत सप्तसुर थंडी गुलाबी गीत गाते
शरीरे दोन जरी...सूर त्यातुन एकच उमटे
मी गंध तुझा...तु रातराणी... मज सोडुन का जाते?

तु समोर असलीस की
सा-या जगात मी
अन तु गेल्यावर मात्र
शोधात माझ्याच मी

सांज ढळली...तारा तुटला...
मनात आशेचा एक अंकुर फ़ुटला...
समजावले मनास मीच
अरे वेडया...जगणे त्यास असह्य झाले
म्हणुन तोही निखळत सुटला...

एकदा तुला म्हटलं होतं
आयुष्यभर तुझी साथ देईल...
मला कुठं ठाऊक होतं तेव्हां
आयुष्यचं माझी साथ सोडुन जाईल

जखम झाली तरी
तीला मी वाहु देत नाही
माझी जखम मी
जगाला पाहु देत नाही

तुझ्या राज्यात मला
थोडीशी जागा दे
राजा म्हणुन नको
पण....प्रजा म्हणुन तरी मला तुझ्या राज्यात घे

कुणाला भेट म्हणुन काही दिलं की
त्याच्यावर मी माझं नावं टाकत नाही
कुणीतरी मला 'ऊगीचच' आठवावं
असं मी मुळीच वागत नाही

जुळले काही शब्द
पुन्हा चार ओळी झाल्या
नसलीस तु जरी
आठवणी तुझ्या तुलाच घेऊन आल्या...

तु फ़क्त सोबत रहा मित्रा
हे आयुष्य असचं जगुन घेईल...
मागितलंस कधि तर
सारं जगही जिंकुन तुला देईल...

सुर्य ढळला....आता चंद्र येईल
अन सबंध आसमंत त्याच्या मंद प्रकाशात न्हाऊन जाईल...
माझ्याही शब्दांना मग उधान येईल
आठवुन तुला...अशीच एखादी कविता पुन्हा जन्म घेईल...

उद्याची वाट कशी पाहु?
मी तुला कसे समजावु?
उद्याचा भरवसा नाही सखे...
चल आजच जगुन घेऊ....

आभाळास पेलुन घेइल
मी वादळास झेलुन घेइल
तु फ़क्त साथ रहा..
क्षणभर मृत्युशीही खेळुन घेइल..

अशी वरवरची हाक नकोय
मनापासुन मला साद घाल...
अवघं आयुष्य तुला देईल
एकदा माझ्या भावनांना हात घाल

माझे जेव्हा सरण पेटले होते...

मज भेटले ते सारे श्रावण कोरडे होते
अन पाहिले मी जे ते स्वप्न भंगले होते

अपराध ना आठवतो मज होता काय घडला
गेलो जिथे मी त्यांनी काटे पेरले होते

नशिब फ़ुटके भेट तुझी न माझी उशिराच झाली
तुज भेटलो मी जेव्हा मज मरण भेटले होते

मज पाहण्या जळताना गाव असा लोटला होता
त्यांना उब दिली माझे जेव्हा सरण पेटले होते

तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं एखादं जाळीदार पान....
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...पण...हातात माझ्या हक्काच असं काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...म्हणुनच वाटतं...
तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नसलोच तुझ्यासोबत तरी माझे शब्द असतील
तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे शब्दही हसतील
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात एवढीच देऊ शकतो तुला खात्री...

रिमझिम पाउस आला गं सखे

रिमझिम पाउस आला गं सखे
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे

तु अन मी...
अन पाउस हा
गारा पुन्हा त्याच्या चल झेलु गं सखे
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे .....

हवा गुलाबी मस्तीत आली...
विसरुन भान आपणही
बेभान पुन्हा होवु गं सखे...
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे

चंद्र ढगाआड दडला
इंद्रधनु सप्तरंगांनी खुलला
रंग त्याचे आपणही चल लेऊ गं सखे
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे

पोरका हा श्रावण
भेटण्या धरतीस आला
प्रेम आपलेही थोडे चल त्याला देऊ गं सखे
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे

माझी दु:खे


माझ्या दु:खांचा मला बाजार मांडायला नाही आवडत
माझ्याच दु:खांशी मला भांडायला नाहि आवडत

साथ माझीच मला देऊन रडून घेतो मी
जगासमोर एक अश्रुही मला सांडायला नाहि आवडत

ठाऊक आहे फ़क्त दु:खेच माझी साथ माझ्या
कुणा आपल्यांच्या शोधात मला हिंडायला नाही आवडत

अजुन जगायला हवं


अजुन जगायला हवं
जग अजुन बघायला हवं
सोसलं नाही अजुन जास्त...
एवढ्यात मरण नको...
अजुन मला सोसायला हवं

कुणीच नसलं जरी
बाजार दु:खांचा मांडलाच आहे
दु:खे माझीच सारी
दु:खांना या मलाच पोसायला हवं

आपल्याच एका क्षणावर
आपल्याच एका श्वासाचा अधिकार
इथं कोण कुणाचा असतो?
मी सांग कुणाला कोसायला हवं?