गीत माझे सूर तू छेड यारा
सूरात तुझ्या सूर माझा
शब्दांस माझ्या शब्द तू जोड यारा...
ही रात्र काजळी पुन्हा ढळून जाईल
तू हास आज
हासणे तुझे वाटे गोड यारा...
भरवसा उद्याचा सांग कुणी कुणास द्यावा?
तू घे जगुन आज
बंधने सारीच तोड यारा...
तू हो कवडसा सुखाचा तुझ्याचसाठी
दु:खे पडद्यामागे लपलेले
दूर त्यांना तू सोड यारा...
निघुन गेलो जरी कधि मी
राहील शब्दांच्या रुपाने सदा
नाते शब्दांशी माझ्या तू जोड यारा...
गीत माझे सूर तू छेड यारा
...
संदीप सुरळे
1 प्रतिसाद
मन मनास उमगत नाही
तगमग हि कुणास समजत नाही
हा शोध कुणाचा? कुठवर?
जो कधिच संपत नाही....
भेटले आजवर कुणी जरी
मृगजळ भासले सारेच
शोध पुन्हा तोच सुरु
जो कधिच संपत नाही....
बंदिस्त मनास माझ्या
तोडुन वाट शोधली
वाट ही पुन्हा त्याच शोधाची
जो कधिच संपत नाही
स्वप्नांत माझ्याच हरवते
नाही बघायची स्वप्न असंही ठरवते
पण अंधार दाटला नेहमीच
जो कधिच संपत नाही
पाऊलवाटा हळुवार होत्या
त्या कधिच दूर झाल्या
हा प्रवास अखंड आता
जो कधिच संपत नाही
...
संदीप सुरळे
1 प्रतिसाद
तोच समुद्र पुन्हा
तोच समुद्र पुन्हा
अन पुन्हा तीच लाट
एकटाच मी या किनारी
...
संदीप सुरळे
0
प्रतिसाद
वारा
आपणही कधि भनानलो होतो
घेऊन कवेत यास मुक्तपणे
नभि आपण विहारलो होतो
...
संदीप सुरळे
0
प्रतिसाद
पुन्हा तुला मी मैत्रिण म्हणुन मागेल
आता तुझं ते भेटणं नाही
दिलखुलास तुझं ते हसणं नाही
निरागस,नितळ वागणं तुझं मनात घर करुन गेलं
अन तुझं बोलणं कितीतरी आठवणी पेरुन गेलं
हसलो मी तुझ्यासोबत अन रडतानाही तुझाच साथ होता
जगलो मी खुप...हातात माझ्या तुझ्या मैत्रिचा हात होता
आठवतो तुला मी अधुन मधुन त्याचा राग नको मानुस
फ़क्त तुझ्या आठवणी आहेत..त्या तू परत नको मागुस
जगाला हसवत स्वत:चे अश्रू पिणारी तू
अळवावरच्या दवालाही तळहातावर घेणारी तू
तू माझं 'श्रद्धा'स्थान अन तुझी मैत्रि माझी 'श्रद्धा' होती
मी निवडुंग...पाहुन तुला...क्षणभर जगलो तू असं रानफ़ुल होती
आठवण तुझी आजही हळव्या मनास आहे...मग सांग मी कठोर कसा ठरलो
अगं...हे नखरे जीवनाचे, मैत्रित कधि मी न मागे सरलो
पुढच्या जन्मातही पुन्हा तुला मी मैत्रिण म्हणुन मागेल
हा जन्म अपुरा पडला पुढच्या जन्मी पुन्हा तुझा मित्र होऊन जगेल
...
संदीप सुरळे
0
प्रतिसाद
पुन्हा आठवणी आल्या
मला जगावसं वाटतं
सारं जग परकं इथं
आठवणींतच कुणीतरी माझं मला भेटतं
सा-या जगाचं परकेपण पाहुन
मन रडु लागतं
मनाला समजावण्यासाठी मग
आठवणींना आठवावसं वाटतं
आठवणींना विसरलो असतो
तर आजवर जगलो नसतो
आठवणींना आठवता यावं खुप
म्हणुन अजुन मला जगावसं वाटतं
पुन्हा आठवणी आल्या
मनात आठवणींची दाटी झाली
मनात दाटलेल्या आठवणींना
डोळ्यांत मला साठवावसं वाटतं
...
संदीप सुरळे
0
प्रतिसाद