कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणाला कुणी असं सोडुन का जातं?
रेशमी वाटणारी घट्ट नाती कुणी तोडुन का जातं?

मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?
जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?
कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास
काट्यांतच मग खुडावं लागतं.....
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं
बरसतानाच नकळत हरवुनही जातं
भर चांदरातीही मनास मग
एकट्यालाच झुरावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये
झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये
वाळवंटी या जगात
एकट्यालाच मग जगावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मी जगुन घेतो एकटा
माझ्याशीच मी हसुन घेतो एकटा
तरी एकट्यालाच रोज रोज मला मरावचं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कवि होऊन जगतो मी

ओरडावसं वाटलं की
मेघ होऊन गरजतो मी
तहानल्यागत वाटलं की
श्रावण होऊन बरसतो मी

होऊन चंद्र चांदराती
चांदण्यांत कधी हिंडतो मी
रुसुन माझ्यावर
माझ्याशीच कधी भांडतो मी

दु:ख जगाची
शब्दांत माझ्या बांधतो मी
देऊन प्रेम
दुभंगलेली मनं सांधतो मी

मनास माझ्या
कागदावर उतरवतो मी
'सुंदर कविता...!' जग म्हणते
माझ्याशीच मग हासतो मी

दुर त्या जगाकडं
जेव्हा बघतो मी..
विसरुन मला
पुन्हा कवि होऊन जगतो मी....

थांब जराशी...


जाउ नकोस अशी सांज अजुन ढळली नाही
थांब जराशी..तुझ्या केसांत लाली अजुन माळली नाही

असा ना किंतु मनात साठवु जराही तु
प्रिये प्रित माझी अजुन मळली नाही

ठाउक मज बदनाम प्रेमात तुझ्या जरी
रित जगाची तरी कधी मी पाळली नाही

मी कधीचा गप्प... तुझ्या नयनांशीच बोलतो आहे
मौनाची भाषा माझी तुज अजुन कशी कळली नाही

मला टाकुन अशी जाउ नकोस आता
थांब जराशी तुही...वाट तुझी मी कधी टाळली नाही...

प्रेमात...


प्रेमात कधी रुसायचं असतं
प्रेमात कधी हसायचं असतं
दुस-याला ह्र्दयी बसवायचं असतं
पण प्रेमात कधी फ़सवायचं नसतं

प्रेम सहज होऊन जातं
निभावणं कधी कधी जिवावर येतं
दुस-यासाठी झुरावं लागतं
याच प्रेमात कधी कधी मरावंही लागतं

म्हणे प्रेम का करावं...दुस-यासाठी का झुरावं...
म्हणे प्रेम का करावं...दुस-यासाठी का झुरावं...
पण प्रेम केलं जात नसतं
मित्रांनो ...
प्रेम हे आपोआप होत असतं

तुझ्या वाढदिवशी...

असे सोनेरी क्षण
तुझ्यावर प्रत्येक क्षणी बरसावे...
प्रत्येक सुखाने
तुझ्याच घरी येण्या तरसावे...

तु घ्यावीस उंच भरारी
अन गाठावीस शिखरं...
साथीला दुनिया सारी
अन सारी तुझीच पाखरं...

फ़ुले दाटावी रस्त्यात तुझ्या
अन काट्यांचाही स्पर्श मखमली असावा...
तु चालता उन्हातुन
तळपणारा सुर्यही तुजसाठी सावली व्हावा...

व्हाव्यात पुर्ण तुझ्या सर्व इच्छा
तुझ्या वाढदिवशी याच तुज सदिच्छा...

ढग आठवांचा...

पाऊस असा कसा आज बरसुन गेला
अनामिक हूरहूर एक, मनात माझ्या रुजवुन गेला

कधि इवल्याशा छत्रिचा आडोसाही खुप होता
आज घरात माझ्याच, पाऊस मला भिजवुन गेला

अगणित थेंब याचे कधि मीच झेलले होते
आज का मग पाऊस हा, मज तरसुन गेला?

कातरवेळ आजची अशी सरींनी वेढुन आली
थेंब प्रत्येक,प्रत्येक सरीचा, मज खिजवुन गेला

ओढ ही कसली मनास माझ्या? ना कळे
ढग आठवांचा, मनात एक गरजुन गेला

मैत्रि


मैत्रि ....सांगुन होत नाही
मैत्रि...करायची ठरवली तरी करता येत नाही
मैत्रि ...मग होते तरी कशी?

मैत्रि होते अशीच नकळत...
कुणीतरी शब्दांनीच मनाच्या तारा छेडुन जातं
मनाशी मन जोडुन जातं
'मैत्रि'चं एक नवं नातं बनवुन जातं
अन 'दोघांनीही त्यास जपायचं' असं म्हणुन जातं...

'मैत्रि' म्हणा किंवा 'दोस्ती'
शब्द तसे लहानच आहेत...
पण आत दडलेले अर्थ
शोधता आले तर खुप महान आहेत....

मैत्रि कधि असते उनाड वा-यासाखी
सबंध आसमंत कवेत घेऊन उडणारी
अन कधि नाजुक फ़ुलासारखी
हवेच्या हलक्याश्या होक्यावरच डुलणारी

दु:खात हसु खुलवते ती मैत्रि
अन आपले अश्रु होऊन ढळते तीही मैत्रि
मैत्रि त्या निर्मळ सरितेसारखी
मैत्रि त्या धुंद श्रावणसरिंसारखी
अंधा-या रात्रि काजवा होऊन चमकते मैत्रि
कॄष्ण-सुदाम्याला पाहिल्यावर समजते मैत्रि

तु जप तुझी मैत्रि
मी जपतो माझी मैत्रि
सारचं फ़ोल यारा दुनियेत या
खरी फ़क्त तुझी माझी मैत्रि.......

मलाच जाळले मी...

जरी होऊन अश्रु तुझेच तराळले मी
तु बोल तुजसाठी मज नाही जाळले मी

रस्त्याने फ़ुलांच्याही मी जपुन चालणारी
मला न ठाऊक तुजवर का भाळले मी

उमजेल मी ...अन समजेल मीही जरा
म्हणुन कधी तुज सांगायचे टाळले मी

तुला माळण्याचा जरी खोटा प्रयास झाला
बघ.... आज तुझेच चंद्र तारे माळले मी

कधी न होती मला जरुर कंकणाची
नकळत तुझ्या नजरी मज न्याहाळले मी

मंद वारा अन धुंद तो श्रावण आजही
स्वप्नांच्या गावा मिठीत तुझ्या शहाळले मी

तुला न ठाऊक भवती ऊब ही कसली
तुजसाठी आज पुन्हा मलाच जाळले मी....

सजणी


अगे लाजवंती
नलाची जणू तु दमयंती
मनाशी माझिया तु खेळ का मांडियला?
अपराध सांग माझा असा काय झाला?

दिपक तु... मी पतंग वेडा
कैसे तुला हे न कळे
ठाउक आहे जरी जळणे
मी पतंग तुजसाठीच जळे

स्वर्गाची तु आहेस परि
नसेल मी चन्द्र जरी
संशय मजवर नकोस करु
प्रित माझी आहे खरी

रांगोळी अंगणाची
तुझ्याच प्रतिक्षेत आहे
तुळस दाराची सखे
तुझीच वाट पाहे

आता तरी प्रिये
गुलाबी ओठांची पंखुडी तु खोल
कर्ण जाहले अधीर
सजणाशी तु सजणी एकदाची बोल....

निवडुंग

मी असा त्या एका समईची वात होतो
जाळले मी मला...मी न कुणा ज्ञात होतो

हुंद्का हा कुणाचा श्रावणास आला?
मीच माझ्यासाठी त्या ग्रिष्मात गात होतो

तू माळ खुशाल नभातला चंद्र आता
मीच तुझा दिस कधि मीच तुझी रात होतो

करार तुझा मीच नामंजुर केला
जीवना..मीच तुज सोडुनि जात होतो

तू शोध सुगंधाची फुले दुसरी आता
निवडुंगाचा का कधि पारीजात होतो?