काय उरले सांग गझले अता ?

चांदण्यांची रात मज जाळून गेली
का सये तू रात ही टाळून गेली ?

सोडले आज दुनियेस तुझ्याचसाठी
रीत दुनियेचीच तू पाळून गेली

मी कधी रडलोच नाही वाटले का ?
आसवे आली तशी वाळून गेली

पान रंगविले तुझ्या प्रेमात हर एक
डायरी ती तू फ़क्त चाळून गेली

काय उरले सांग गझले अता तुझ्यात?
नाव माझे आज तू गाळून गेली

प्रश्न

तुझ्या मिठीत रात्र जाळण्याचा प्रश्न होता
पण रित या जगाची पाळण्याचा प्रश्न होता

शब्द न लेखणीला स्फ़ुरले का माझ्या तेव्हा
तुझेच नाव जेव्हा गाळण्याचा प्रश्न होता

खुलत गेलो होऊनी फ़ुल तुझ्याच रस्त्यावरती
पण ग्रिष्मात त्याला जाळण्याचा प्रश्न होता

तुझाच गाव येता पावले अडखळली अर्ध्यात
तुझीच वाट राणी टाळण्याचा प्रश्न होता

उगीच शोधतो मी आठवांना सांग तुझ्या का?
अता तुला गझलेत ढाळण्याचा प्रश्न होता
शब्द--संदीप सुरळे

बरे झाले

बरे झाले तू तेव्हा मारले
ऐन मरणाने जेव्हा तारले

नकोसे झाले उसणे श्वास हे
भाव जगण्याचे अता वधारले

अश्रु सुकले, खंत न उरली अता
मरण्याआधिच मन हे वारले

अता वाटे जिंकावे काय ते?
प्रेम जेव्हा अर्ध्यात हारले
--संदीप सुरळे

किती?

ओठांनी ओठांना आवरावे किती?
दोघांनी दोघांना सावरावे किती?

शोधून जरी थकते नजर माझी तुला
नजरेस नजर भिडता बावरावे किती?

वेडं मन, वेडं तन, शब्द वेडावले
होऊन असे वेडे वावरावे किती?

कोण असा मी? काय तुझ्यापुढे वाटतो?
अग वेडे! सांग, मला तू वरावे किती?

पूर

कसे सांगू मी माझा कोण होता
मी आणी सुखदुखा:चा नेहमीच त्रिकोण होता

मला पाहताना कधि माझेच बिंब आचंबित
माझाच श्वास माझ्या क्षणाचा चोर होता

आपल्यांचा नाही मागमुस कुठे
इथे माणसांचा भरला बाजार होता

मृगजळामागे मी असाच धावत गेलो
घराबाहेर माझ्या झिंगत मोर होता

शोधावया निघालो एक क्षण जीवनाचा
वळून पाहता मागे...माझ्या घरात पूर होता

अरे मरणा

मरणास माझ्या
मज टाळायचे नाही
जगण्याचे खोटे वादे
मज पाळायचे नाही

जीवन सुंदर खुप जरी
कुठवर माझा ते हात धरेल
मृत्यु 'सुंदर' त्याहुन
जगण्यावर एकदा मात करेल

मरण्याआधि माझ्या
मज हसायचे आहे
हसवले जिवनास जसे
मरणासही हसवायचे आहे

अरे मरणा..मी तुझाच
शेवटी तुलाच भेटणार आहे
तुला भेटेल तेव्हा
सगळी बंधन..श्वाससुध्दा तुटणार आहे
--संदिप सुरळे

काही न बोलता...काही न सांगता....

श्वास माझा...आयुष्यभर माझी साथ देणारा...
तोही जाणारच आहे मला सोडून एक दिवस...
काही न बोलता...काही न सांगता....

जगाची रितच आहेच ना ही...
काम झालं...वेळ आली.. की जायचं सोडून...
काही न बोलता...काही न सांगता....

कित्येक क्षण येतात आनंदाचे...क्षणभर जगवतात हसत हसत...
पण...पण क्षणभरच फ़क्त....मग तेही जातात सोडुन...
काही न बोलता...काही न सांगता....

नियमच आहेना हा... मी तरी टाळू कसा?
वेळ आली की जावचं लागेल मलाही सोडुन
काही न बोलता...काही न सांगता....

नको गं..

मला अशी तोडू नको गं...
एकट्याला तू सोडू नको गं...
डाव प्रेमाचा रंगू दे खुप
स्वप्नातसुध्दा त्याला मोडू नको ग...

अबोल माझ्याशी राहू नको गं..
स्वप्नातसुध्दा एकटी जाऊ नको गं..
भर तुझ्या प्रत्येक शब्दात मला
गीत एकटीचे तू गाऊ नको गं..

पाठमोर्‍या मला पाहू नको गं..
भेटलो जिथं आपण..एकटी तिथं जाऊ नको गं..
तुझा अश्रुसुध्दा माझा
आठवणीत माझ्या त्याला वाहू नको गं...

लगागा
कशातरी या सुन्या राती टाळतो मीलगागागा गागालगा गालगागातुझ्यावीना माझे मला जाळणे हे
अता पाळणे हेहातात होतोश्वासात होतोशोधात होतो
गालगागा लगागा गालगागा
वाटले हे जगावे मी जरासे
अंगणी वाटले तू दरवळावे
श्वास का हे अडखळलेले?गालगागा लगागा गालगागा
का तुझी आठवे शोधात माझ्याजिंदगीच्या जरा भासात होतो
नाव का आज माझे खोडले तू मी कधीचा तुझ्या गीतात होतो
जाळतो मी टाळतो मीपाळतो मीगाळतो मीचाळतो मीढाळतो मीमाळतो मीवाळतो मीढासाळतो मीओशाळतो मी
रीत आहेप्रित आहेगीत आहेमीत आहेजीत पीत आहेभीत आहेहीत आहे

हिशोब मांडाया बैसलो
अन श्वासांची उधारी झाली
भरुन वाहीली झोळी आजवर
आज श्वासंना महाग झाली

आठवणीची शिदोरी
अन वेदनांचे चटके आता



*****************************
*****************************

गालगागा लगालगा लगालगा
*****************************
प्रेमगावा तुही अता फ़िरुन ये
चांदराती मिठीत मजला भरुन घे
घाव प्रत्येक आजवर
रातराणी गंध श्वासात धुंद धरुन घे
फ़िरुन घे
झुरुन घे
ठरुन घे
करुन घे
सरुन घे
उरुन घे
पुरुन घे
************************************
************************************
गालगागा गालगागा गालगागा
************************************


गालगागा गालगागा गालगागा

हुंदक्याला टाळणेही गैर येथे
आसवांना ढाळणेही गैर येथे



मी असा अपराध होता काय केला?

तू मला का माळणेही गैर येथे?


आठवांशी का अताशा वैर झाले

आठवांना चाळणेही गैर येथे



काठ ह्या नदिचा मला हा का मिळाला?

सोवळ्याला पाळणेही गैर येथे



पान मी एक त्रासलेले...संपलेले

संपताना वाळणेही गैर येथे



चार खांदे शोधताना हार झाली
का मला 'मी' जाळणेही गैर येथे?

अशी गं काय सारखी रागवत असतेस?

अशी गं काय सारखी रागवत असतेस?
माझ्यावरच्या प्रेमाला अशाही प्रकारे दाखवत असतेस...
तू रागवायचं...मी प्रेमाने तुझी समजुत घालायची...
खुप खुप प्रेम करायचं तुझ्यावर.....
कदाचीत यासाठी....
याचसाठी तू रागवत असतेस पुन्हा पुन्हा....हो ना?
ठाऊक आहे मला....
ठाऊक आहे मला....तू नसलीस बोलत तरी तुझे लटके डोळे सारं सारं सांगुन जातात
मी बघावं तुझ्याकडे प्रेमाने म्हणुन तुझ्याचसारखे तेही वेडे आस लावुन बसतात.
मी खुप खुप बोलत रहायचं......
एकट्यानेच....
तू नुसतंच ऐकायचं...
थोडा वेळ......फ़क्त थोडा वेळ गप्प राहायचं....
तसं तुलाही ठाऊक आणी मलाही तू बोलशील लवकरच माझ्याशी....
थोडा वेळ शांतता...
तसं मनाला तुझ्या वाटतच असतं बोलावं खुप खुप माझ्याशी...
अन काही वेळाने बोलायचं मग माझ्याशी...
अगदी लडीवाळपणे..अगदी नेहमीच्याचसारखं...
जणुकाही तुला राग आलाच नव्हता कधि माझा....
अगदी तसं वागायचं माझ्याशी.....
माझं होऊन जायचं पुन्हा नेहमी सारखं.....
सारं सारं विसरून....
जमलं कधि तर... माझ्या डोळ्यांत बघ तेव्हा डोकावुन... किती आनंद असतो दाटलेला......
पुन्हा चिंब चिंब न्हाऊन निघालेला असतो मी तुझ्या प्रेमात तेव्हा ....
पण खरं सांगू ?खुप बरं वाटतं तुझं रागावणही मला.
तुझा राग गेल्यावर वाटतं... जणु तू पुन्हा एकदा नव्याने भेटलीस मला.
असं वाटतं आता पुन्हा नवी भेट....पुन्हा नवी ओळख....
पुन्हा नवी स्वप्नं....पुन्हा नवी क्षितीजं..........दीप