बरे झाले

बरे झाले तू तेव्हा मारले
ऐन मरणाने जेव्हा तारले

नकोसे झाले उसणे श्वास हे
भाव जगण्याचे अता वधारले

अश्रु सुकले, खंत न उरली अता
मरण्याआधिच मन हे वारले

अता वाटे जिंकावे काय ते?
प्रेम जेव्हा अर्ध्यात हारले
--संदीप सुरळे

0 प्रतिसाद: