बरे झाले तू तेव्हा मारले
ऐन मरणाने जेव्हा तारले
नकोसे झाले उसणे श्वास हे
भाव जगण्याचे अता वधारले
अश्रु सुकले, खंत न उरली अता
मरण्याआधिच मन हे वारले
अता वाटे जिंकावे काय ते?
प्रेम जेव्हा अर्ध्यात हारले
--संदीप सुरळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिसाद:
Post a Comment