दीपा आणी गणेशच्या कवितेवरुन....
सात फ़ेरे घेतले होतेस तू
सात वचनं दिली होतीस तू
सात जन्म साथ निभावणार होतास तू
झुठ सारं...
तुझी वचनं झुठ...
तुझं अस्तित्व झुठं...
अस्तित्व एकचं....मी एकटी तुझ्यावीना!
तू तर सुटलास रे..
झाल्या असतील वेदना तुला
मला सोडुन जाताना...
पण त्या क्षणभर होत्या...
अन मी...
मी मरतेय क्षणोक्षणी ..
अन श्वासागणीक सरतेय
.............सरेल मीही कधीतरी अशीच तुझ्यासारखी
कदाचित तुझ्यासाठी....
पण तोपर्यंत...
तोपर्यंत मला जगावं लागणार आहे
एकटीलाच...
तुझी विधवा म्हणुन...
एक अबला म्हणुन...
कारण...कारण आता सांडलाय माझ्या कुंकवाचा करंडा....
कुंकवाचा करंडा....
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिसाद:
Post a Comment