अस्तित्व

रात्र होता
तुझ्या साम्राज्याचा पाया मजबुत होतो
जगमगत्या जगाला
अगदी श्वासालाही कंप फ़ुटतो
हळुहळु तू गहिरा होत जातो
मलाही माझ्यापासुन हिरावुन घेतो
मी शोधतोच वाटा या काळोखात
पण महाकाय सावलीत तुझ्या हरवुन जातो
झाडं, पानं, फ़ुलं..
सारे सारे क्षणात हरवतात
दीवसभर फ़ुलांचे रस्ते
आता काटे रस्त्यावर दाटतात
सावलीही माझी मला सोडुन जाते
तीही तुझी आश्रीत होते

माझं अस्तित्व वीरु लागतं
नाईलाजाने तुझं अस्तित्व मान्य होतं
मीही मग थांबुन घेतो...
तुझ्या वीरण्याची वाट पाहतो...
शब्द -- संदीप सुरळॆ

0 प्रतिसाद: