'यदा यदा ही धर्मस्य..'

वादळाच्या सळसळणार्‍या जिव्हांना
अन समुद्राच्या अघोरी भयप्रस्त लाटांना
जेव्हा स्व:तच्या अस्तित्वाचा रंग चढू लागतो...
जेव्हा जेव्हा काळरात डोळे विस्फ़ारते
अन पायवाटाच पायांमध्ये अड्खळू लागतात माझ्या
तेव्हा तेव्हा मी पेटून उठतो..
मी सांगतो वादळाला, त्या महाकाय लाटांना...
त्या काळरातीला अन त्या वाटेलाही..
मी 'त्राहीमाम..त्राहीमाम..' ची भीक नाही मागणार इतक्यात
माथा नाही टेकणार तुमच्या माजलेल्या अस्तित्वासमोर
दोन हात करेल..लढेल..
जिंकेल की कोसळेल ठाऊक नाही..
पण संपणार नाही..
कोसळलो तरी उठेल..पुन्हा पेटेल..
पुन्हा झुंज देईल...मीही आग होईल..
'मी' काय?
'मी' कोण?
जाणाल मग मला तुम्हीही.. मी तोच प्रत्येकात दडलेला..
वेळ येईल मग...
माझ्या विचारांची श्रुंखला, माझ्या शब्दांच्या बेड्या
तुमच्या अजस्र बाहुंना विळख्यात घेतील
तुमचा कालिया होईल...
बुडला जाल तुम्ही..
तुमचेच डाव तुमच्याविरुद्ध होतील..
आणी पुन्हा एकदा...
पुन्हा एकदा मग
'यदा यदा ही धर्मस्य..' सार्थ होईल...

0 प्रतिसाद: